Saturday, June 20, 2009

दुर तरी माझी आठवण ठेव

कसे तुला सांगू एकांत तो कसा
त्या पानगळीला विचार विरह तो कसा।
उगाच फ़सवांचा आरोप का देतेस?
विचार तु काळालाही
तुझी आठवण न आली तो क्षण कसा!

आयुष्य अल्लड......म्हणून मी शांत आहे
असंख्य जखमांचे देणे....म्हणुन मी शांत आहे।
सांगावी म्हणतो जगाला कहाणी माझी;
येइल त्यात तुझे नाव..म्हणून मी शांत आहे।

शेवटी इतकचं म्हणेन की,

आठवांत राहीन ही ईच्छा ठेव;
नजरेपासून दूर पण मनात ठेव।
म्हणत नाही मी नेहमी साथ दे;
दुर तरी माझी आठवण ठेव

-
मंदार
29-04-09

1 comment:

Mrs.Neha N Kulkarni said...

I LIKE YOUR POEM MANDAR.REALLY IT IS VERRY GOOD.