Friday, November 14, 2008

तशीच मैत्री कर माझ्याशी ..

मैलांचे अंतर मागे टाकून लाटा किनारागत पोहचतात;
काही क्षणच त्या किनार्‍यावर राहून जातात..
थोडी वाळु घेउन जातात थोडे पाणी थेउन जातात ;
भेट न पुन्हा कधी पण जन्माची ओढ ठेउन जातात

जगतांना असे बरेचसे अनुभव येतात.. बरेच वेळा अनोळखी व्यक्ति येतात आयुष्यात काही क्षणा करीता . कधी केवळ एक क्षणाची भेट पण खुप आनंद देउन जातात , आठवणी मागे ठेउन जातात.. कोण कुठली व्यक्ति त्या गोष्टी गौण असतात. त्यांच्याशी खर तर कुठलाच ह्रणानूबंध नसतो . पण कुठेतरी एक अनामीक ओढ असते मग ती भेटीची असो, नुसतेच बोलण्याची असो किंवा त्यांच्या सुखाची असो ... ती आपुलकी म्हणा ते जे काही असते ते मग काहीही असो .. त्यांच्या सुखासाठी आपल्या मनात एक संवेदना नक्कीच असते; कारण ते काळजाच्या वाटेने आयुष्यात आलेले असतात.
बरेच वेळा अश्या संवेदनांना नात्यात बांधणे हे त्या अनामीक नात्यासाठी धोक्याचे असते . त्यांना नात्यात बांधण्याच्या प्रयत्नात त्यातील संवेदना आपूलकी ओढ सगळ संपुन जाते.म्हणुनच ते जे काही आहे ते तसेच अनुभवावे .. कारण त्यातच त्याचा गोडवा टीकुन आहे.
म्हणून मी नेहमीच म्हणतो की ...


हजारो मैलांचा प्रवास करून येणार्‍या लाटांची
आणि किनार्‍याची भेट असते काही क्षणांची ...
तशीच मैत्री कर माझ्याशी ..
पण ओढ असु देत हजारो मैलांची ।

-----
Mandar Hingne

Thursday, November 6, 2008

तूझी वाट पाहणे...!

तूझी वाट पाहणे
ही वेगळीच बात आहे ...
तूझा विरहातही
तूझ्या आठवांची साथ आहे..

आठवण म्हणजे..;
सतत विचारात तूझ येण असत.
का
आठवण म्हणजे,
तू न मागताही तूला बरच काही देण असत

...आठवण म्हणजे;
तूझं मन आपोआप मला कळणं असत
की
एक नातं आपल्या मनाच
ऎकमेकांशी जूळणं असत

केव्हातरी मग
मन माझ होते अलवार
शब्दांकडे उघडते मग
माझ्या आठवांचे दार

मी मग होत जातो
एकटाच भरभरून व्यक्त
आणि समोरचे सारे विश्व
ऎकत असते माझ मन फ़क्त

अतातरी तुझ्या पावलांना
माझ्या दिलाचा रस्ता कळू देत
प्रेमाच्या नात्याने मग,
दोघांची ओंजळ अता भरू देत ..


--
मंदार हिंगणे

Tuesday, October 28, 2008

मज आठवीते तू माऊली

दिवाळीचा सण थोर
सजवीतो घर दार
मांडतो दारापूढे
तेलदिव्यांच्या रांगोळी
पाहून दिव्यांची आवली
मज आठवीते तू माऊली ।


आठवीता दिवाळी
मनी दाटते तूझे रूप
चैतन्याने ओतप्रोत
तूझा घरातील वावर
उजेडात पणतीच्या
तूझी तेजाळते सावली
मज आठवीते तू माऊली ।

जरी आज दूर पोटासाठी
जाउ दिलेस तु मला
माहीत मला अन तूलाही
आहे ते माझ्याच भल्यासाठी
झाली चार वर्षे पाहुनी तूला
जिव होतोय ग वरखाली
मज आठवीते तू माऊली ।

आज सुख लोळती पायापशी
तरी जीव मायेचा उपाशी
तुज भेटाया झुरतो मी
का न ठेवले तू मला
ग आई तूझ्या पदराखाली
मज आठवीते तू माऊली ।

Friday, October 24, 2008

!...... चातकाची हाक.......!

आले आले घन-मेघ हे दाटून
पुन्हा आला श्रावण एकदा फ़िरून

भिजवीली माती दरवळे सुगंध
नाचती पाखरं एकरूप होवून

गरजला नभातूनी हा नाचला रानभर
सैदामीनी गाई गाणे नभास बिलगून

टपोर्‍या थेंबानी शहारले अंग अंग
सरीत पावसाच्या हरपले भान

तापल्या धरेवर गारव्याची पखरण
थबकल्या मनावर आशेचे किरण

बरसणार्‍या क्षणात उभा हात पसरून

येना सये अता ते पाश दुर सारून

नसे मल्हार जरी कमी न मझी साद
झणी ये धावत ही चातकाची हाक।

--
मंदार हिंगणे
२३/१०/२००८

Saturday, October 4, 2008

ऒर हमे मंजीलोसे वास्ता था |

न खुदासे शिकायत थी न तकदीरोंसे वास्ता
चले थे जहांपे वो मेरा अकेलेका ही था रास्ता

चलते चलते युहीं, मुकाम तो कयी गुजरे गये
पर, मंजर की चाहमै हम रास्तोंसे दूर न गये

खूशबू जैसे कयी लोग हमे तो राहों मै मिले
खूशकिस्म्त है हम, वो थोडी दूर तो साथ चले

तमाम उम्र कोन यहां किसका साथ देगा
लेकीन ये न कम था, थोडी देर तो उनसे मूखातीव थे

वो तो एक शब की मुलाकात थी,
नशेमै थे हम तुम, कल की किसे खबर थी

दि तो थी उन्होने दस्तक मेरे दिल पर ;
अब तो किसी ऒर की आहट है मेरी जिंदगी पर

रात के साये मै तुटा वो बेहोशीका आलम था ;
जाग रहे थे चिराग राहों के, ऒर हमे मंजीलोसे वास्ता था

मंदार
27-09-2008

Sunday, September 21, 2008

मेरी नजर मै खुदा भी बेकसूर नही ।

माना के वक्त ने की बेवफ़ाई
हसरते और आरजू भी आज रूसवां हैं
पर इतनी बूरी भी तो नही सभी लोग
क्या दोस्तोंके भी दूवाओं मैं असर नही हैं ?

लब्ज तो हमेशा अपना रंग दीखाते है
खूशी हो या गम अपनीही बाजी खेलते है ।
उनसे गीला क्या, नजरीया बदलो जरा अपना ;
शायद प्यार करनेवाले आपके आसपास ही है

रूसवाई का हक्क माना आपही रखते है
और हम है की मनानेकी कोशीश करते है
जाने-अंजाने मै दिल आपका तोड बैठे;
और आप है की हमासे नफ़्रत करते है

आप तो मिट्टी का आशीयाना बनाते गये
और अफ़सानोंको हकीगत मै फ़िरोते रहैं
हम न थे हमारे कभी, थे पहेलेसे किसी और के
और आप हमे बेवफ़ा कातील बनाते रहैं

गम मैं हसने वालोंको रुलाया नही जाता
जैसे लेहेरोंसे पानीको हटाया नही जाता
होनेवाले तो बस हो जाते अपने तकदीरसे
किसी को कहकर अपना बनाया नही जाता

आखीर मैं बस इतना कहूंगा आपसे ..

कोन है जो मंजरसे दुर नही ?
कोन है जो जिंदगीसे मजबूर नही ?
गलतींया तो सभी करते है,
मेरी नजर मै खुदा भी बेकसूर नही ।

----
मंदार हिंगणे

Wednesday, August 13, 2008

एकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना

एकदा मला पाहाचय
तूला पाउसात भिजताना
तरसताना बघाचय
त्या बरसणार्‍या क्षणांना

असावी तू चिंब भिजलेली
ओल्या केसातूनी थेंबे ओघळलेली
ओला पदर थोडा सरावा बाजूवर,
अन काजळी गालावर ओघळलेली

व्हावे मीही थेंब एक कुणीसे
तुझ्या डोईवर पडून पायापर्यंत घसरावे
सुखावेल मीही तुझ्या ओलत्या स्पर्शाने
निथळारे रूप तुझे मनात साठवावे

असे पाऊसाने थैमान घालावे
मनाचे सारे बंध क्षणी कोसळावे
तूझ्या देहावरून ओघळण्यासाठी
जणू मग थेंब थेंब तरसावे

स्प्रर्श तुझे तन-मनी काहूरणारे
शब्द तूझे मल्हार छेडणारे
खूपव्यात कोसळणार्‍या जलधारा
जसे मदनाचे तीर रूतणारे

ओलते रुप घ्यावे बाहुत भरुनी

भारावते मन की गरज स्पर्शाची
बान्ध कसा घालु माझीया मनाला
वासना नव्हे ती ओढ मिलनाची

व्हावे फ़ूलांचेही अंतर
तेव्हा आपूल्या मिलनात
रक्तातून उसळावी प्रीत
श्वास मिळावीत श्वासात

दूर जवळ ते प्रश्न
उगा पडावेत कशाला ?
दोन शरीर एक जीव
बाकी उरावेत कशाला ?

मंदार हिंगणे

Thursday, July 17, 2008

पीता पीता पीता... मी पीत गेलो..!

पीता पीता पीता... मी पीत गेलो
पीतां पीता ... मी क्षण क्षण झुरत गेलो


आठवता डॊळे नशीले मी शराब पीत गेलो
डोळ्यातल्या पाण्यात मी आकंठ डूंबत गेलो


प्याला ते अनेक प्याले मी रिजवीत गेलो
प्याल्यातल्या छबीला मी पुन्हा पुन्हा चूंबत गेलो ।


नशा तर मी करणार, त्यात नाव दारुचे खराब का
दारूची चूक ती काय? मीच चेहेरा "तीचा" बघत गेलो ।


पीणार मी इतका की दर्द सारे आता संपून जावेत
सोडुन ती गेली अन मी दारुस जवळ करत गेलो ।


बेवफ़ा सनम तुझ्यापरी ही दारू नशीली कैकवार बरी;
ह्रुदय जाळत होती.. तरी ओठांनी स्पर्शीत मी गेलो ।


प्याल्यावर प्याले मैफ़िलीत लोग संपवीत होती;
संपलेल्या प्यालात मी माझे रक्त भरत गेलो ।


परतीच्या वाटेवर शक्ती देहातली संपली नेमकी जेथे
तिथे कधी दिल्या घेतल्या वचनांची शपथ घेत "गेलो" ।



मंदार
१७-०७-२००८

Wednesday, May 21, 2008

नसतेस घरी तू जेव्हा ... ( विडंबन )

नसतेस घरी तू जेव्हा ... ह्या संदीप खरे ह्यांच्या नितांत सुंदर गाण्याचे.. मी विडंबन केले आहे.. तेव्हा प्रथम त्यांची माफ़ी मागतो .
आज सकाळीच त्या गाण्याची लिखीत प्रत माझ्या ईमेल वर आली.. ती वाचतांना जे सुचत गेले ते लीहीत गेलो. कूणास दुखवीण्याचा हेतू नाही.. एक आनंद म्हणून बघावे ही सगळ्याना विनंती ....
क्षमस्व..
-----------------------------------

मुळ काव्य:

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तूटका तूटका होतो
जगण्याची विरती धागे
संसार फ़ाटका होतो..

नभ फ़ाटून वीज पडावी
कल्लोळ तस ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसूनी जाती मागे
खिडकीशी धबकून वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघव वेळा
श्वासावीन ह्रुदय अडावे
मी तसाच अगतीक होतो

तु सांग सखे मज काय
मी सांगू ह्या घरदारा
समईचा जीव उदास
माझ्यासह मिण मिण मिटतो

न अजूनी झालो मोठा
न स्वतंत्र अजूनी झालो
तुजवाचुन उमगत जाते
तुजवाचुन जन्मच अडतो

----------------------------------------

असतेस घरी तू जेव्हा
जीव धडका धडका भरतो
हिमतीचे विरती धागे
जीव बार फ़ुसका होतो ...

वस्तू लागून काच फ़ूटावी
आवाज रोजचाच येतो
ही भांडी दिशाहीन होता
अन पती मारका होतो

येतात पाहूणे दाराशी
हिरमूसूनी जाती मागे
खिडकीशी गाव तो सारा
तव गूण पसरवत जातो

तव मूठीने मिळणार्‍या
मज खुपती जाचक खूणा
मुख दाबून बुक्के पडावे
मी तसाच स्तंभीत होतो

ते सांग देवा मज काय
मी सांगू ह्या जगताला
एकला मी न उदास
हरएक रोज रोज पीटतो

न थांबला तो तंटा
न मी चीत अजूनी झालो
तीलाच आवरत जातो
दिनरात कसेसे लोटतो

--
मंदार हिंगणे
२१/०५/२००८

Thursday, May 15, 2008

माझ्या चारोळ्या - माझ्याच आरोळ्या !! :-) - ( २ )

माझ्या चारोळ्या ...
......... माझ्याच आरोळ्या
माझ्या ह्या वेडेपणालाही
...... माझ्याच टाळ्या ..
-------------------------------------
काल रात्री एका वादळाने
माझे शब्द उडऊन नेले होते ।
दमुन भागून आज तेच
माझ्या झोपडीतच झोपले होते ।
-------------------------------------
आलचं जर डोळ्यात पाणी
तरं "हारला हा" म्हणुन दैव सुखावेल;
म्हणुन मनात असुन सुद्धा
मला मोकळेपणाने रडता येत नाही
---------------------------------------
अश्रु आठवणींचे डोळ्यात दाटुन येतात,
तरी ओठांवर हसु पेरावे लागते ।
ही मुहोब्बत पण काय चिज आहे दोस्ता
जिच्यावर करतो तिच्यापसुनच लपवावी लागते ।
------------------------------------------
आठवणींनी कितीही काहूर माजविले तरीही
आता भावना आवरायचं जमतयं ।
कितीहीवेला रेतीवरचे नाव पूसले सागराने तरीही
आता त्याच्याशी मैत्री करणे जमतयं ।
--------------------------------------------
आज सगळी उत्तरे आहेत
पण आता कुठलाच प्रश्न नाही ।
रडणे तर अता रोजचेच आहे
पण डोळ्यात पाणी नाही ।
-------------------------------------------
जर तुला रडु आलं तरं
दोन थेंब अश्रुचे माझ्या राखेवरती गळु देत ।
मरण माझं वाया नाही गेलं
हे जरा "त्या" जगाला तरी कळु देत ।
-------------------------------------------
कसे सांगु मी की तीला भेटण्याची आस नाही ;
आठवणींच्या डोहातल्या ह्रुदयास आजही आराम नाही ।
विसरून जावे तीला अताशा, पण काय करु दोस्ता ;
विसरावे कुणाला ह्या दिलाचा दस्तुर नाही ।
-------------------------------------------
दु:खात हसणारे कधी रडत नाही ;
लाटांपासुन पाणी वेगळे होत नाही ।
होणारे स्व:ताहून आपले असतात;
कोणी सांगून "आपले" होत नाही
------------------------------------------
समजाऊन सांग तुझ्या आठवणींना
त्या न बोलावताच येत असतात ।
तु तर दुर रहून सतवत असतेस ;
त्या जवळ येऊन रडवत असतात ।
-------------------------------------------
आज लब्जोंनेभी हमसे बडी साजीश कि ;
हमारी शायरी को छोड अफ़सानोंसे दोस्ती कि ।
रुसवां है हमारी यादे हमारेही उल्फ़त कि;
आज तनहाई भी करने लगी सदके उन्ही की राहों कि ।
--------------------------------------------
अब इससे ज्यादा इन्तेहां इंतजार की क्या होगी ;
आखें खुली थी ओर हमे दफ़नाने की रस्म अदा हुई थी ।
--------------------------------------------
वेळ जात होता, धडकन थांबत होती
हसत होतो मी पण डोळ्यात आसवे होती ।
साथीला माझ्या तर सारा जमाना होता;
पण न जाणे का तुझीच गरज होती
------------------------------------
का तुकडे केलेस ह्रुदयाचे असे,
तुझ्या आठवणीत आसवेही सुकुन गेली।
तुझ्यावर प्रेम केले इतकीच का चूक होती?
का तू माझ्या आयूष्यात दर्द देउन गेली।
------------------------------------
मी तो जज्बा..जो बनून ह्रुदय धडकतो
मी तो सूगंध... जो मिठीत परीमळतो
मजवर असा जीव नको लाउस ग
मी तो दर्द ... जो डोळ्यातून ओघळतो..
------------------------------------
दुखानी हसू न दीले कधी..
जगाने रडू न दीले कधी...
प्रश्नानी जगू न दीले कधी,
थकून चांदण्यात पहूडलो जेंव्हा..
आठवानी तूझ्या झोपू न दीले कधी ....
------------------------------------
कसे तुला सांगू "एकांत" तो कसा
त्या पानगळीला विचार "विरह" तो कसा।
उगाच फ़सवांचा आरोप का देतेस ?
विचार तु काळालाही -
तुझी आठवण न आली तो "क्षण" कसा!
--------------------------------------------
आयुष्य अल्लड......म्हणून मी शांत आहे
असंख्य जखमांचे देणे....म्हणुन मी शांत आहे।
सांगावी म्हणतो जगाला कहाणी माझी;
येइल त्यात तुझे नाव..म्हणून मी शांत आहे।
-----------------------------------

मंदार हिंगणे

माझ्या चारोळ्या .... माझ्याच आरोळ्या !! :-) - ( १ )

माझ्या चारोळीच्या चारही ओळी,
तिनेच मला शिकविल्या ।
दोन ओळी ती गुणगुणली
आणि दोन मी तिच्या डोळ्यात वाचल्या ।
------------------------------------------------------------
जपत किनारा शिड सोडु नकोस
अन वार्याची वाट पाहू नकोस ।
तु ठरव दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटांवर झुलु नकोस ।
-------------------------------------------------------
भाव डोळ्यातील कधीतरी उलगडतील
स्पर्शातून, गाण्यातून वा एखाद्या कवितेतून ।
ते तुझ्या अस्तित्वाचे पुरावे आहेत ;
मांडु देत हा प्रपंच निदान ह्या आशेवरून ।
------------------------------------------------------
देशील का माझ्या हातात तुझा हात ?
शपथ घेतो देईन अखेर पर्यंत साथ ..
मी तुझा अन तू माझी राहू ना असे
जसे जळताना एकरूप दिसे तेल आणि वात
------------------------------------
प्रेमात शब्दांना महत्व नसते ....
दाटल्या भावनांना काही बंध नसते...
डोळेच सांगून जातात हाल ह्रुदयाचे ...
होकाराला शब्दांची गरज नसते ...
------------------------------------
माझ्या प्रेमाला लपऊ कसे ?
दिलाच्या धडकण्याला थांबऊ कसे ?
आज पून्हा मज भेटून ती गेली;
पण मनातल्या भावनांना आवरू कसे ?
------------------------------------------
प्रेमात साथ तर प्रत्येक क्षणांची असते
कोणी दाखवतो..... कुणी लपवीतो ।
मजा खरी तर तेंव्हाच येते दोस्ता;
विरहाचा क्षण जेंव्हा जवळ येतो ।
------------------------------------------
प्रेम जर सुख!.. तर आपण का दुखावतो ?
प्रेम जर पाणी!.. तर आपण का जळतो?
प्रेम जर उब!.. तर आपण का थरथरतो ?
प्रेम जर आनंद!.. तर आपण का रडतो?
प्रेम जर शाश्वत!.. तर आपण का मरतो ?
म्हणुन ....
प्रेम हे प्रेम असावे. ती मजबूरी नसावी
तुमचे प्रेम नेहमीच आपली गरज असावी.
-------------------------------------------
आयुष्यात नेहमी स्मार्ट लोग येतील,
कूणी जास्ती तर कुणी कमी असतील..
निवड जरा विचारपूर्वक करशील..!
जरूरी नाही तुला माझ्यासारखेच मिळतील
-------------------------------------------
कोणा न कोणावर विश्वास ठेवावा लागतो
अनोळखी कोणी मग जवळचा बनून जातो।
नेहमीच गूणांच्या कसोटीवर नात जडेल असे नाही;
बरेचदा आपण अवगूणांवरही फ़िदा होत जातो।
--------------------------------------------
नजरेला नजर देऊन तर बघ
नवीन नातं जोडुन तर बघ;
मनाच्या इच्छा मारण्यात काय फ़यदा;
जरा तुझा शब्द टाकून तर बघ।
हे आकाशही सामावेल तुझ्या मिठीत;
जरा प्रेमाने हात पसरवून तर बघ।
-------------------------------------------------------
मैत्री बोलते .. प्रेम शांत राहते
मैत्री हसते .. प्रेम रडवत असते
मैत्री भेटते .. प्रेम विरहात जगते
तरी का लोग मैत्री सोडुन प्रेम करतात ?
-------------------------------------------
तु उद्दीष्टांच्या पूर्तीस नशिब समजतेस...
आणि मी तुला माझे नशिब समजतो...
खुप फ़रख आहे तुझ्या माझ्या नजरेत..
तु माला फ़क्त एक स्वप्न ;
आणि मी तुला माझं सर्वस्व समजतो ....
----------------------------------------------

मंदार हिंगणे

Thursday, April 24, 2008

कविता कशी सुचते..??

कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.

कधी ती बाळकडु पाजते
कधी ती व्यासंगात बोलते
कधी ती प्रेमात गुंतते रंगते
कधी ती अध्यात्म साधते
कल्पनेच्या बैठकीवर भावनांची मांडणी असते
कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.
कधी ती आई असते
कधी ती बाबा असते
कधी भाऊ तर कधी ताई असते
कधी ती नात्यांना सांधते
कधी ती अनामिकांना जोडते
कधी मित्र तर कधी मैत्रीण असते
कधी बायको तर कधी मेव्हणी असते
कधी स्वत:च्या तर कधी इतरांच्या मनातली मेख असते
कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.
कधी ती आठवणींशी भांडते
कधी ती मुक्यानेच आक्रंदते
कधी ती माझ्यातल्या "मी" वर हसते
कधी ती माझ्या नसण्यावरही रडते
कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.
कधी ती आत्मकेंद्रीत असते
कधी ती विश्वाला वेधते
कधी ती राखेतून जन्मते
कधी ती अनंतात लोपते
ना आदी ना अंत अशी ब्रम्हमय होते
कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.
कधी ती थांबता थांबता वाढते

कधी ती वाढता वाढता संपते
कवीता काय अशीही सुचते......
....... कवीता काय तशीही सुचते

-----------------
मंदार हिंगणे

23/04/2008

Saturday, April 19, 2008

उद्या जर ... !

कधी कधी रात्री जागून मी
तीला गाढ झोपलेलं बघतो .....
शांत स्वप्नात हरवलेल्या तीच्या
चेहे‍र्‍यावरच्या मूकरी हास्यात... मी हरवतो...
कटाक्ष टाकून मी पून्हा लवंडतो ..
आणि एक विचार नेहमीसारखा
माझ्या मनात रूंजी घालू लगतो ....
"जर मी उद्या उठलोच नाही ..
.... तर कळेल तीला कधी
मी तीच्याबद्दल काय विचार करतो ..??"

.
जर माझा "उद्या" आलाच नाही... !
तीला कधी उमगेल का माझे प्रेम ??
की ती जीव माझा....माझे सर्वस्व आहे ...
मी पूरेसा यत्न केलाय का तीला भासवीण्याचा..???
करतोय किती प्रेम हे सांगण्याचा ???

.
आणि जर येथली संपली असेल माझी वेळ ..
..... तीला जगावेच लागेल माझ्यावीना ;
जर माझा "उद्या" आलाच नाही... !
जगेल का ती माझ्या प्रेमाच्या आधारे ....??
.

म्हणुन मी अता मनाशी ठरवलय ...
प्रत्येक दिवशी..प्रत्येक वेळी ..
मला तीला सांगायच ..
तीचे माझ्या आयुष्यातल स्थान .., माझ प्रेम
तीला सगळ सगळ सांगायचं ....
न जाणो "उद्या" परत सांगता येईन की नाही...?

----
मंदार हिंगणे
१६-०४-२००८

Friday, April 4, 2008

पाण्याचा एक थेंब.......

पाण्याचा एक थेंब आज ढगातुन खाली उतरला...
.
सुर्यकिरणांवर पडला... सोन्यासारखा चकाकला
.
इंद्रधनुवर बसला.... सप्तरंगात मनसोक्त रंगला
.
पाना-फ़ुलांनवर विसावला... मोत्यासारखा दिसला
.
पण चुकुन एकदा विस्तवावर पडला..अन अस्तित्वच हरवला
.
पाण्याचाच थेंब तो..वाईट संगतीचा परीणाम विसरला.

---
मंदार हिंगणे,
१६/१/२००८;

Thursday, March 20, 2008

आज पून्हा ती बात झाली !!

आज पून्हा ती बात झाली
सांज ती पून्हा अंधारुन आली ;
हसलो तरी अश्रू फ़सवूनी गेले
तूझ्या आठवांची बरसात झाली ।
.
मैफ़िलीत तुझीया जे सजवीत गेलो
गीत तेच मज लपेटून आली
टाळीले जरी तयांना दूर मी लोटीले;
आज पून्हा तीच माझ्या गळा दाटली ।
.
स्पर्शातून, गाण्यातून वा कवितेतून मांडली
आठवणीनी त्या आज पून्हा साजीश केली
शोधतो आजही तूझ्या अस्तित्वाचे पूरावे;
आशा ती सारी डोळ्यातून वाहून गेली ।
.
अखेरच्या क्षणी तीची भेट झाली
अडल्या प्रश्नांची सगळी उत्तरे मिळाली ;
विसरण्या दुनीयेस आता विसरून जातो
अलविदा म्हणण्याची आता वेळ झाली
.
आज पून्हा ती बात झाली,
बरखा ती आज पून्हा घुसमटून आली
उमगले तीलाच फ़क्त बंध दोन्ही मनांचे;
संगे आमच्या आज ती ही बरसून गेली ।
.
आज शेवटची ती बात झाली,
दोन अश्रू माझ्या राखेवर सांडुन गेली,
व्यर्थ न गेले मरण माझे;
प्रीत ती सार्या जगतास दावून गेली ।
.
--------
मंदार हिंगणे
२०/०३/२००८

Friday, March 14, 2008

जाता जाता ती नवी जखम देउन गेली,



जाता जाता ती नवी जखम देउन गेली,
येते येते सांगुन कायमची निघुन गेली !
.
आज कुठे दुर ती मज विसरुन गेली ?
पाश ते कुठले की प्रेमरित मोडुत गेली ?
.
अपुर्ण ती स्वप्ने जी सजऊन ती गेली
प्रेमतराणे माझी पायदळी तुडवुन गेली
.
रस्त्यात तीच्या फ़ुलेच अंथरत होतो
जरी साथ ती वणव्याची मिळत गेली
.
मारले मलाही ज्यांनी, कुणी त्याना सांगु नका
कुडीपाशी ते शस्त्रे तयांची विसरुन गेली

-------

mandar hingne

14/03/2008

Tuesday, March 4, 2008

मी कविता करत नाही !

न ठावे कशी कविता-चारोळी ..अन मज गझलही कळत नाही
कागदांवच्या काळ्या रेघोट्यांना मी कवीताच म्हणत नाही


लीहतो ते फ़क्त भाव मन-आकाशी अवघडलेले,
छंद अलंकाराची जाणीव मज कधी झालीच नाही


चारोळ्या अन कविताही तीच माला शिकवीते
अक्षरांचे गीरवीणे माझे. ती शायरी मझी नाही..


अनेकदा लेखणीही सांगे... मान वर करु नकोस काही
शपथ तुला माझी .. संपेपर्यंत खाली ठेवायचेस नाही


"तिच" उतरवते भाव मनीचे..ती कल्पना माझी नाही
संवेदना विरोनी गेल्यात.. आलापना ही माझी नाही


शब्द जुळुनी ओळी तयांच्या कवीता होतात
लीहीतो फ़क्त मी .. मी रचीता तयांचा नाही


मी खरच कवी नाही अन कवीता ही करत नाही
गळ्याशपथ सांगतो मित्रांनो मी कविता करत नाही



-------
Mandar Hingne
01/09/2007

तीला मी बघीतले जितुके - विडंबन

संदीप खरे ह्यांची माफ़ि मागुन मी त्यांच्या गझलेचे विडंबन करततोय असे
काही चुकले असल्यास मला सग्ळ्यानी समजुन घ्यावे हीच विनंती ...
मुळ गझल : -


तीला मी बघीतले जितुके; तीतके कुणी बघीतले नाही..
तीला बघेणे आता जरुरी राहीले नाही

तयानी मोजलीच माझीच पापे न्य़ान देता
तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही

तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासात
तिचेहे वागणे माझे तिलाही झेपले नाही

कसा सुचतो तीला श्रुंगार हे मला समजले नाही
कसे सुचले मला गाणे तीलाही उमगले नाही

कसा वाख्या तयाना समजऊ मी धुंद डोळ्याच्या
तिला प्रत्यक्ष तयानी एकदाही पाहीले नाही

तिच्यासाठी निघाले प्राण सरले भान जगण्याचे
तिचे काही स्वत:चे एकदाही बिघडले नाही

मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटउन सारी
असा झालो फ़रारी मी मज पुन्हा पाहीले नाही
-----------------------------------------------------------------------------------


विडंबन :-
एखाद्याला कविता आवडत नसतील आणि नेमके त्याची प्रेयसी जर कवयत्री असली तर काय ....... ????
त्याच्या मनस्थितीचे वर्णन करण्याचा हा एक प्रयत्न ... कोणासही दुखविण्याचा हेतु नाही.. केवळ एक गमतीचा भाग म्हणून घ्यावा ही विनंती ...
----------

तीला मी ऎकले जितुके कुणीही ऎकले नाही..
तीला ऎकणे आता मला सहन होतही नाही ॥१॥

तीनीच ऎकविली तीचीच कड्वे जणु श्राप देता
आठओळींच्या चारोळीला कुणीही (आजवर) देखीले नाही ॥२॥


तीने लावला सुर तेव्हा भरल कापरं अंगात
तीचे मुक्तछंद काही मला झेपले नाही ॥३॥


कसा सुचते तिला काव्य हे मला समजले नाही
कसे आठवले काम (नेमके) हे तिलाही उमगले नाही ॥४॥


कसे ओळखु मी मात्रा त्या विपरीत काव्याच्या
अलंकारांची बाराखडी मी कधीही गिरवीली नाही ॥५॥


काव्यात तीच्या अडकलो; उडाले केस माथ्याचे
तीचे गायने गझल काव्यांचे कधीही थांबले नाही ॥६॥


मनाचा निश्चय करुनी मागे ठेवली ती कविता ती शायरी
सटकलो तेथुनी अचानक असा आजवर कुणीही पळाले नाही ॥७॥


------
मंदार हिंगणे
२१ / ११ / २००७.

मी यातला नाही !!

मी विसरलो नाही; की घेतला वसा मी मातलो नाही
चालतोय ज्या वेळेतुन फ़क्त वेळ ती माझी नाही...


मी सोसले बरेचसे.. उगा मी काहीही सोसणार नाही
पोटसाठी केवळ मी माझ्या आत्म्यास बाटवणार नाही


आग लागलीय काळजाला..म्हणुन लंका मी जाळणार्यातला नाही
भोगुदेत कर्माची फ़ळे तयांना..मी माझे कर्म दूषीत करणार नाही


रखरखते अतीत; म्हणुन भूतकाळाच्या जखमां पाहुन रडणार नाही .
सरतील वाळवंटे कोरडी...म्हणुन मी सागराचे पाणी भरणार नाही.


मी जगतो "उद्या"साठी.. म्हणुन कसेही जगावे यातला मी नाही
न पाहीलेल्या भविष्यासाठी मी माझे वर्तमान डावलणार नाही



---
मंदार

Tuesday, February 12, 2008

गझल ती माझी प्रेमात रंगत होती !!






तराणे ह्रुदयाची धडकनेच गात होती
गझल ती माझी प्रेमात रंगत होती


ल्यायली ना सुर ना साज मैफ़िलीत होती
आलापली प्रीत ती म्युक्यानेच होती


नुमगली कधी भाषणे तीच्या डोळ्यातली
जिंकतांना आज डाव का मज देत होती?

भातुकली नव्हे ती ओढ आपल्या मनाची
तोडुनी बंध नदी आज सागरासमीप होती


डोळात थांबलेली आर्तता काळजातली
तरी करीत का बहाणे गझलेची होती?


क्षणी बरसली ओढ ती डोळा दाटलेली
भिजऊत जी गेली ती आपूली प्रीत होती

----
१२/०२/२००८

तिच्यासाठी !!

तिच्यासाठी मी तळपणारा सुर्य होइन,
तिच्यासाठी मी आयुष्यभर जळीन ।

तिच्यासाठी मी चंद्र नभीचा होइन,
चांदण्याच्या मैफ़िलीसंगे प्रेमगीत मी गाइन ।

तिच्यासाठी देवघरातला दिवा मी होइन,
कितीही मिणमिणलो तरीही तीलाच प्रकाश देइन ।

तिच्यासाठी तीची सावली मी होइन,
तीने नाही ओळखले तरीही, सोबत तीच्या राहीन ।

तिच्यासाठी खळखळणारा झरा मी होइन,
तीच्या साठी सागरासही जाउन भिडेल ।

तीच्या साठी करता येइल तीतके करुन मी घेइन,
तीच्या साठी मरता आले तर जीव माझा देइन ।

तिच्यासाठी मेलो तरी बेहेत्तर,
तिच्यासाठी मातीतुन पुन्हा मी उगविन ।

-------
17/09/2007, Cameroon

Monday, February 11, 2008

Ashi प्रेयसी असावी !!



प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी


चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठुन दिसणारी असावी


गालीबची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी


यश-राज पिक्चरची हिरोईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फ़ुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण आंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी


हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी


ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्याना हळुवार जपणारी असावी


ओळख असुन सुध्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी


केव्हातरी कुठेतरी ती भरभरुन व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपीत मग डोळ्यानीच सांगणारी असावी


थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फ़ुगण्यात मज्जा असावी


हसतांना गोबर्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पडन्याची मग माझी रीतच व्हावी



ईवल्याश्या नाकावर राग घेउन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मीठीत रडणारी असावी


चोरुन चोरुन भेटायला येणारी असावी
हातात हात घालुन मग सगळ्यांसमोर फ़िरणारी असावी



तीच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुखात सदा दोघांची साथ असावी


जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फ़ुलवणारी असावी



आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांन्च्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी


प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी



तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरुप होऊन जळतांना इतरांना प्रकाश देणारी असावी

------
०४ / ११ / २००७.

लव्ह आट फ़र्स्ट साईट !!

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं बरच ब्राईट असत
आपलं सोल-मेट शोधण्याचं नेट आणि थेट तंत्र असत
सापडलं तर ठिक नाहीतर थोड वेट करायचं असत

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं फ़ास्ट असत
इतर कुथल्याही प्रकारापेक्षा जास्त इफ़ेक्टीव्ह असत
स्वप्नांच्या गावी झटकन पोहचवणारं ते जेट असत

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं ग्रेट असत
जैसी उर्मिला वैसा फ़ॊर्मुलाच कधी ते सेट असत
पहीले वहीलं असलं तरी ते एव्हर-लास्ट असतं

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं स्ट्रेंज असत
कळत नकळत कधीही कसेही कुठेही ते घडत असत
सरळ साध्या आयुष्यात उलथा-पालथ घडवत असत

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं पाऊसाची सर असत
सर पडुन गेल्यावरही पागोळ्यागंत उरुन राहण असत
चैतन्याचे इद्रधनुने आकाशातुन धरणीवर उतरण असतं

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं बरच काही असत
कधी सगळ सांगणार तर कधी सगळ लपविणार असत
ओठात अडले तरी डोळ्यांतुन निथळणारं ते गुपीत असत.

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं प्रेमच असत
कधी फ़सत तर कधी उमलत असत
पुष्कळदा अनामिक नात्याचं जोडलेल ते बंधन असत

बरेचदा जवळच्या नात्यानाही प्रेम माहीत नसतं
असल्या जळपट नात्यांच्या तुलनेत ते खरच छान असत
निदान ज्याच्यावर जडत त्याच्या सुखासाठी तळमळत असत
कारण शेवटी ते प्रेमच असत, जरी ते लव्ह आट फ़र्स्ट साईट असतं

----
६ / ११ / २००७.

Saturday, February 9, 2008

तु म्हणजे एक स्वप्न !!


तु म्हणजे एक स्वप्न...,
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे........ ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
मनात दडुन ठेवलेले,
कितीही भासविले तरीही,
........... डोळ्यातुन ओघळणारे ।
तु म्हणजे एक स्वप्न...,
नसानसात भिनलेले,
श्वासासारर्ख जवळचे,
तरिही दुर दुर असणारे... ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या आठवणीत जगणारे,
मिटताच डोळे तूला बघणारे,
.... अन उघडताच तुलाच शोधणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
दिवसा सुद्धा छळणारे,
ती सोबत नसतानाही,
........ असल्याचे भासविणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
आठवणींचा कोंदवाडा करणारे,
अनेकदा सावरले तरीही,
...........पुन्हा सर्व पसरणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
माझे कधिही न झालेले,
तु दुर असलीस तरीही,
....... तुझ्या सुखासाठी तळमळणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या विरहात एकटेच जगणारे,
तु जिंकावीस म्हणुन,
...... कितेकदा स्वत:लाच हरविणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
येण्याची तुझ्या, त्याच वळणावर वाट पाहणारे,
प्रत्येक वसंतात झडुनही,
........ पालवीची आस धरणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
शब्दा शब्दात विणलेले,
दिलाच्या भावानांनी सजलेले
.... अन फ़क्त कागदावरच राहणारे।

--
मंदार हिंगणे
Cameroon, २१ / ०४ / २००७

Friday, February 8, 2008

"आनंदाच झाड" !

आनंदाच झाड माझ्या अंगणात आहे
खोल रुजलेले माझ्या जिवनात आहे

उन पाउस झेलतं
साद नभाला घालतं
पानगळ सोसुनही,
पुन्हा बहरुन येतं

पाखरांचा सुर त्याच्या मोहरात आहे
चैतन्याच गीत त्याच्या काळजात आहे

आनंदाच झाड माझ्या अंगणात आहे
खोल रुजलेले माझ्या जिवनात आहे



तुम्हाला माहीतीय "आनंदाच झाड" कसं उगवत ?

"कल्पनेची एक बी घ्यायची....
तीला मायेच्या जमीनीत पेरायचं....
तीला कॊतुकाचं खतं घालायचं...
आणि नित्यनीयमानं प्रेमाच्या झारीतुन पाणी घालायचं त्याच्या मुळाशी..."


खरतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, त्या स्वभावाशिवाय त्याला जगताच येत नाही. तो स्वभावच त्याची शक्ती असते.., तोच त्याला आनंदाप्रत पोहचवत असते..सांभाळुन ठेवत असते..

आनंदाची पाठराखण करणारे अशी कितीतरी माणसं दिसतील. भगतसिंग..मदनलाल धिंग्रा.., सावरकर, असे एक ना अनेक उदाहरण देता येतील. "स्वातंत्र्य" हाच एकच त्यांचा स्वभाव..तोच स्वभाव त्यांना आनंदाप्रत घेउन गेला. त्याच आनंदाच्या सामर्थ्याने त्याना प्रतीकुल परीस्थितीतुन तरुन नेले..

कष्टांची तमा त्याना नाही.. पण आनंदाने काट्यानाही गोंजारणारी.... भयंकर वास्तवातही मग आपली स्वप्नांची दुनीया बसवीणारी... कोणी कितीही त्यांच्या स्वप्नांवर अविश्वास दाखवला तरीही त्याच अविश्वासाच्या घाट्ग्यावर विश्वास ठेऊन स्वप्न बघणारी.

भग्न स्वप्नाच्या तुकड्याना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही ! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी बांधुन ठेवता येत नाही ! त्याला भविष्याच्या गरूड्पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद स्वप्न पाहणं, ते फ़ुलवणं, ते सत्यात उतराव म्हणून धडपडण, त्या धडपडीतला आनंद लुट्णं .. आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावल तरी त्याच तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलांनी दुस~या स्वप्ना माने धावणं हाच मानवी स्वभावधर्म आहे. मनुष्य जिवनाला अर्थ येतो तो त्यामुळं !

खर सांगायच तर... "आनंद" ही एक स्थीती आहे.. की ज्याप्रत माणसाने पोहचण्याची धडपड केली पाहीजे.. ऊन-सावली... सुख.- दुख... रडणे-हसणे...दैव-प्रारब्ध-कर्म हे सगळे क्षणीक बघा..क्षणा क्षणाला सरड्यासारखे रंग बदलणारे. आनंदाने त्यांच्यावरही मात करता येते.

आनंद असावा त्या "बी " सारखा... जमीनीत खोल काळोखातुन अंकुरुन सुर्याकडे झेपावणारा
आनंद असावा त्या "झाडा" सारखा... वणव्यात पोळुन सुद्धा पुन्हा पालवीची आस धरणारा
आनंद असावा त्या "लवचीक वेली" सारखा... कुठल्याही स्थितीतुन तरुन जाणारा..
आनंद स्वस्त आहे... कारण त्यासाठी पैसा मोजावा लागत नाही
आनंद कालातीत आहे.. कारण तो कुठल्याही काळात मिळू शकतो.
आनंद अक्षय आहे.. कारण कितीही वाटला तरी संपूच शकत नाही
आनंद ध्रूवा सारखा अढळ आहे.. एकदा सापडला की कोणीच हिराउ शकत नाही...


आपणा सर्वांनाही हा अमुल्य आनंद मिळो हीच श्रीचरणी प्राथना ।

--------------------------------------------
[वरील लेख मी.. श.ना.नवरे लिखीत "आनंदाच झाड" ह्या त्यांच्या पुस्तकावर आधारीत चित्रपटावरुन लीहीले आहे. त्यावर "आनंदा" विषयी मला जे वाटल ते मी शब्दात बसवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो आपणासही आवडेल.]

धन्यवाद.
मंदार

मी माझा !!!

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता. न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, "समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?" त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, "यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, "त्याला काय फ़रक पडला?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला" .

माझे ही असेच आहे काहीतरी , जगा आणि जगु द्या यावर माझा विश्र्वास आहे. खर तर माणसाने झाडासारखे असावं; झाड कधिच सुखासुखी वठत नाही, ते नेहमीच ओलावा शोधत राहतं; तेच खरं खरं प्रेम करत जिवनावर. मग ते जिवन कितीही विरुप कितीही वेडेवाकडे वा कितीही विद्रूप असु द्यात. म्हणुनच म्हणतो - माणसानं झाडासारख वागावं, कारण मृत्युनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नसते.

जी माणसे हवीशी वाटतात ती कधी भेटत नाही आणि जी माणसे नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही. ज्यांच्याकडे जावेशे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही आणि ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते त्यांच्याकडे जावेच लागते. जेंव्हा जीवन नकोसे वाटते तेंव्हा काळ संपत नाही, जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो पण तेंव्हा काळ संपलेला असतो. नशीब हे असच असते त्याच्याशी जरा जपून वागाव लागतं तिथे कोणाचेच चालत नाही जिकडे नेईल तिकडे जावेच लागत. अशावेळेस फुले आपल्याला बरेच काही शिकवतात......,

गुलाब सांगतो,येता जाता रडायचं नसतं,काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,अंधाराला घाबरायचं नसतं,काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,रुसुन रुसुन रहायचं नसतं,हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,संकटात चिखलात बुडायचं नसतं,संकटांना बुडवुन फुलायचं असतं.

मी खरतर खुप खुप बोलायचे ठरवतो, माझ्या भावनांना शब्दात बसवायचं ठरवतो, चार ओळी जोडुन कवीता करायची ठरवतो; पण शब्द अबोल होतात,मन मात्र बोलयला लागत मग आठवणीशी भांडण होतं. कधीतरी नंतर मग मुक्या भावनांनचे शब्द होतात, आपसुक चार ओळींची कविता होते, एक गोष्ट मात्र नक्की माझ्या असण्यापेक्शा, माझ्या नसण्यातच मी जास्त जगतो.

आठवणींची बात निघालीच तर मैत्री कशी मागे राहीन. -

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात


...आठवून पाहायचो मी काही पावसाळे मीत्रांच्या संगतीत भिजलेले, हवेभोवती गंध घेवून रानोमाळ पसरलेले, जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी गुलाबी स्वप्नातून जागवणारी , नुसतीच मग एक निरर्थक धडपड अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. दाटलेलं धुकयाचे मग सावकाश पाझरणे अन "आठ्वणींचे" ओले होवून जाणे; एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी उगीचचं भरुन येते माझी गोठलेली "पापणी".

मैत्री म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, कुठल्याही स्थितीत तरुन जाणा~या लवचीक वेली सारखी, कुठेही दडली तरी चमकणार्‍या हिर्‍यासारख अस्तित्व दाखवणारी.

पण मी खुप भाग्यवान आहे, खुप चांगले मीत्र मीळालेत मला. तसे तुम्हा सर्वाना मीळो हिच सदिच्छा.