Saturday, April 10, 2010

!! जरासा !!

रात्र मंद धुंद होती,
वारा बोचरा होता जरासा
नेहमीचा प्याला होता,
जामही होता जरासा।

लालेलाल जळजळता
प्यालातला जाम जरासा,
जोडीला तुझ्या आठवांचा,
फ़ेसाळता बर्फ़ जरासा।

एक आठवण एक प्याला,
खेळ रंगला जरासा,
मी तर मी, सवे माझ्या
जामही धुंदला जरासा।

विरघळे हलकेच रात,
अन नशा तुझ्या आठवांची,
हरएक जाम देत होता
गंध तुझा जरा जरासा।

पहाट हसते एकलीच,
उरही भरला जरासा,
मी मानली हार जेव्हा
जामही सांडला जरासा।


-
मंदार (साद मनाची)
०६-०४-२०१०

Sunday, March 21, 2010

तव गझला उमलता गुलाब होता |

तव गझला उमलता गुलाब होता
शब्द तयातला फ़ुलता शबाब होता ।

अनोळखी तु तरी कशी ओळ्खीची?
अडलेल्या प्रश्नांचा हा जवाब होता ।

गगनात होतो जळता चांद मी एकला
तव गझलेचा मिळाला आफ़ताब होता ।

कळे न कसली ओढ होती मनाला;
हासरा-लाजरा असा कातील नकाब होता ।

न शायर मी, तरी कशी केली शायरी;
आज तार्‍यापरी जळाला महाताब होता ।


--
मंदार (साद मनाची)
२०-०३-२०१०.

Thursday, March 11, 2010

खेळ खेळलो जरी हारलेला

.
मी आज मजलाच जाळुन आलो
तीच्या केसात गजरा माळुन आलो ।

आठवे पुन्हा पुन्हा तीच धुंद वेळ
मी व्यर्थ माझ्या मना चाळुन आलो ।

रंगल्या त्या क्षणांची भेट अनोखी,
गंध मोगर्‍याचे श्वासात ढाळुन आलो ।

चिंब भिजलेलो मी जादुई पावसाने
बरसणार्‍या चुंबनात ढगाळुन आलो ।

चांदण्याचा स्पर्श गं तुझ्या स्पंदनाचा,
मी मिठीत त्या मजला सोडुन आलो ।

मी हा खेळ खेळलो जरी हारलेला,
मी प्रेमरीत जगाची निभावुन आलो ।


-
मंदार (साद मनाची)
१०.०३.२०१०.

आजचा चंद्र...

.
अंधारु आले आकाश..
संधीप्रकाश..

बोचरा वार
एकला रान सारा ..

दिवेलागणीची वेळ
सुरु होतो खेळ.

एक चांदणी ..
दुसरी चांदणी ...

उमलते नक्षत्र ..
चढु लागते रात्र ..

चांदही उगवला ..
सुवासही जरा सावरला ..

आजचा ,
तो चंद्र तुझ्यासारखा..
गोरा पान ..
शीतल..
गुदगुल्या करणारा
गालात हसणारा ..

अगदी तुझ्यासारखा..
तेच योवन त्याचे
तीच गर्विष्ठता..

आणि

तीच दुरी ठेवणारा ...





--
मंदार
१०-०२-२०१०

शुद्ध पाण्याने भरलेल्या प्याल्या

.
रात्री औफ़िसमधुन घरी आल्यावर
बायकोला सांगतो ..
अग एक "ग्लास" तर आणं..

फ़ोडणीच्या तडतडीत..
आणि भाजीच्या चुरचुरीत तीचा आवाज येतो..
आलेचं हं बसा तुम्हि ..

आणि मग ग्लास घेउन ती येते
स्वयंपाक घरातुन..
लटकत मटकत.. घेउन जराशी गीरकी ..
सोबत येतो मोगर्‍याचा गंध
तीच्या केसातील वेणीचा ..

मग ती टेप वर गाण लावते
"दिल चीज क्या हैं आप मेरी जान लिजीये"
आणि त्या गाण्याच्या ओळीवर
स्वत: गुणगुणत मला "ग्लास" देते ..

अता दिलाच आहेस ग्लास ...
तर मग ओत ह्यात
तुझ्या धुंद साथीचे ..
तुझ्या धुंद सुवासाचे..
काही हळवे नशीले क्षण...
आणि पाज मला तेच नशीले रसायन
तुझ्याच धुंद हाताने ..

ती हसत हसत मग त्यात "शुद्ध पाणी" भरते

येते एक वेगळीच
त्या "शुद्ध पाण्याने भरलेल्या प्याल्याचीही" नशा ..
मयखान्यातल्या प्रत्येक मद्यांना मागे टाकेल अशी



-
mandar (Sad Manachi)
08-03-2010.

Friday, March 5, 2010

नजर

नजरेची नजरेला ही साद आहे
सये तुझ्या डोळ्यात मी कैद आहे |

तुझ्या डोळ्यांचा मज एका सहारा
नको बरासावू धारा मी वाहत आहे |

घ्यावे तुला मिठीत मला प्रश्न आहे
लाजल्या डोळ्यांचा काय जबाब आहे |

तुझी माझे प्रीत डोळ्यातून बोलकी
मुके मुके राहुनी तू गात आहे |

कसली धुंदी तुझ्या डोळ्यात आहे
कसले नाते नवीन तू गुंफत आहे |

-
मंदार
21-11-09

मी तुला पहात होतो

अंगणी प्रेमाचे सप्तसुर गातांना
झाडावरूनी अबोली तोडतांना
चोळी थोडी तटतटुनी येतांना
सये, लपुन मी तुला पहात होतो

मन धावले धुंद
विचार झाहले संथ
स्वर ते हळवे अंगणात पसरतांना
सये, मी गाणे ते ऎकत होतो

वर्ण ते साजीरे
सुंदर ते नाहलेले
सांजवेळी चमकतांना
सये, माडीवरुन मी तुला पहात होतो

हळुच अंगणी यावे
तुला मिठित घ्यावे
परी पाहुनी तुला लाजतांना
सये, पुन्हा मी दारात थांबत होतो


-
मंदार
(साद मनाची)

Shri Vi. Da. Savarkaranchya "Tanuvel" hya kavitevarun kahi suchale te lihile. Asha karto aapanas aawadel.

तुझ्या कारणे

.
आठवाना आठवावे असे नसते
तरी आठवून "आठवण" आठवतो
आठवात सवय जडली इतुकी,
न कळे असा मी कितीक आठवतो

आठवून आठवून आठवणार किती
मनाला का कधी असतात भिंती
स्वैर स्वैर वागणे आठवांचे
मारून मुटकून कोंडणार किती

न आठवणे कधी असे चांगले
न जमे मजला ते तसे वागणे
हताश मी पुरता अश्या आठवाना
तुला न ठावे, हे सारे तुझ्या कारणे



-
मंदार
२४-०२-२०१०

सार्थकता (Vinodi Kavita)

मोहोल्यात तुझिया येणे, न कधी सोडले मी
"नाही" म्हणालीस तरीही, पुसणे न कधी सोडले मी |

न एकटा मी, झाले लाख घायाळ येथे;
तुझ्या नजरेशी नजर देणे, न कधी टाळले मी |

किती कडक पहारा, भावांचा तुझ्यावरी हा
त्यांनी अनेकांना अनेकदा बुकलाताना पहिले मी |

मार खाण्यातही एकाला मी काही नव्हतो
मार खाउनी अनेकदा, फक्त वसा न कधी तोडला मी |

सार्थकता ह्या तपाची कधी अशीही व्हायची होती;
काय म्हणतेय ती पहा येथे, जे न कधी ताडले मी |

रे माकडा जा, जरा पहा चेहेरा आरशात खरा
पदवीस त्या ही, हृदयाशी कवटाळणे न विसरलो मी |

कळवळलो जरासा, अन निघालो माघारी
जातानाही अनेकदा वळून वळून तिला पहिले मी |

हे व्हावे असे, देवासही बहुदा मंजूर नव्हते काही;
पहा आली माकडीण मागे, अन पुढे पुढे चाललो मी |


--
मंदार
२३-०२-२०१०

आता सोडले मी

मैफिलीत तुजीया येणे सोडले मी
घेतल्या जखमांना उकरणे सोडले मी |

ऋतूचक्रात माझ्या पाऊस नुरला काही
तुला साद घालणे आता सोडले मी |

रंग मेहेन्दिचे तुझ्या हातावरी सजले जेंव्हा
मी माझे तुझ्यात रंगणे सोडले मी |

आठवात तुझ्या हे जीवन आहे जायचे
आताशा हळू हळू मरणे सोडले मी |

आहे आयुष्य अजूनही पुढे बाकी;
"बेदील" करून तुला, वाहने सोडले मी |


मंदार
२३-०२-२०१०

Wednesday, February 17, 2010

आठवणींचा डोह

.
अरे ! हे असले सगळे
भास का होतायेत ....
मनाची आस घेऊन
हे भावनांचे वारे का धावतायेत .

कोण आहे तिकडे,
कोण आहे इकडे
कोणाचा आवाज हा,
कुठून येतोय साज हा

तो पहा... तो पहा पुन्हा आला
उजवीकडून आला
डावीकडूनही आला
वर आकाशातही घुमतोय...
अन हे माझे चरा-चरही स्पंदन करू लागलीयेत
त्याच तालावर

कोण छेडतोय हा मल्हार,
दोर तर कुठेच दिसत नाहीये
पण, कोण ओढताय मला अलवार......

आवाज तर,
विलक्षण जीवघेणा गोड
तरल..
सांजेला पसर्णाऱ्या लाली सारखा
कोण गातंय असे,
का जीव वेडावतोय?
अन डोळे कुणाला शोधातायेत पुन्हा पुन्हा?

आताशा....
काहीच कळेनासे झालाय
त्या चहूकडे घुमणार्या आवाजाचे
त्या तरल सुरांची आवाजाची गळा मिठी पडतेय
ते गात्रांना उमगत नाहीये...

अनुभवतोय ते फक्त अस,
ह्या विलक्षण जादूचा डोह असावा....
अन धैवाताच्या किनार्यावरून फक्त झोकून द्यावे स्वतास तस...
बुडबुडा नाही,
तरंग नाही एकाही,
आणि खळबळही नाहीच..
सरळ गाठावा तळ...

हो डोहच तो,
तुझ्या गाण्याचा,
तुझ्या आवाजाचा,
तुझ्या सुरांचा
अन, पुन्हा पुन्हा मला खेचणाऱ्या
आणि तुझ्या अस्तित्वाचे पुरावे देणाऱ्या
तुझ्या "आठवणींचा डोह" ....

तुझ्या "आठवणींचा डोह" ....



-
मंदार
१६-०२-२०१०

Wednesday, February 10, 2010

तुझी आठवण ~~ 1 ~~ .

खोलीतील एकटा कि गर्दीतील एकटा
तर आम्ही बुवा गर्दीतले एकटे...
म्हणूनही कदाचित तुझी आठवण
नित नित सोबत करते मला

तशी तुझी आठवण येते
ह्यास काही काल वेळ नाही
जरा कुठे खुट्ट वाजल
तरी येते की तुझी आठवण

आठवांचा आवेग मात्र वेग वेगळा
जोर जास्त असलाच तर कविता होते..
नाही तर गालात हसून व डोळ्यात रडून आवेग ओसरून जातो

आत्ता तर तसा स्वताच्या असण्यात जगण्यापेक्षा
स्वताच्या नसण्यात जास्त जगतो मी त्याचा एकाचा फायदा असतो ...
तुझ्या आठवण्पासुना कधी दूर नसतो मी

तुझ्या आठवण्पासुना कधी दूर नसतो मी


-
मंदार
११-०१-2010

Tuesday, December 8, 2009

! फ़ुलराणी !

.
जी काल दिसली मला
फ़ुलराणी ती कुणी होती
नुर तीचा वेगळा नशीला
तीची नजर जादुई होती

कोण ती.. कुठली ती
मज प्रश्न असे नव्हते
एक अजीब होती सलगी
वाटे स्वप्न सामोरी होते

नाजुक ती ऎसी जैसे
फ़ुलपाखरु फ़ुलांवरले
देउनी रंग घेउनी गंध
तीने हे आसमंत धुंदवीले

आवरु कसा मी मला
मनावरी जोर नव्हाता
बांधु कसा मी इच्छेला;
ओढीस त्या दोर नव्हता

ती अशी रुप लेऊन आली
चांदणीचे रुप घेउन आली
गंधभारल्या तुझ्या श्वासांना
रातराणीही हुंगुन आली

जरा बावरलो जरा गोंधळलो
कोण देखणे कसे कळावे ?
फ़ुलराणी ही की परी देखणी
की संदर ह्या बागेतील फ़ुले

वेडे मन वेडे तन
शब्दही वेडावले अता
ये पुन्हा तू फ़ुलुन ये
हे जिवन तुजसाठी अता

शोधु कसे ती कुठे हरवली
सांगावा माझा देईल का कुणी?
नाजुक नवेली ती अलबेली
गेली मज वेड लावूनी......


--
मंदार (साद मनाची)
०८-१२-२००९

भ्रष्ट (वाळीत टाकलेला)

मी शांत
तरी प्रशांत
मुख हासरे
उरी आकांत

मला वेदना
भंगली अर्चना
थांबला दिन
संपली आलापना

वेसेवरी एका
थांबलो पुन्हा
प्रवेश ना मिळाला
काय माझा गुन्हा

भ्रष्टीत मला
केले सांगा कुणी
माणुसास आज
माणुसकीची उणे

टाकाऊ मी परी
नव्हे शिळे अन्न
माणसा परीस तरी
माणुसकीस आसन्न

गावतल्या मंदीरात
मिळे माणुसकीचे न्यान
संपताच पोथी - पुराण
सर्व सर्व कोरडे पाषाण

बाटलेला जरी
मला अभिमान आहे
खोट्या पावीत्र्याची
मला कीव आहे


--
मंदार (साद मनाची)
०७-१२-२००९

कवीत्व

ऎसे नाही की देशी ह्या कवी नाही जन्मला
नुसताच नाही कालीदास येथे घालीब होता जन्मला

महाकाव्ये ही ह्या देशी कमी ना झाली कधी
पानांवर पाने नुसतीच ना भरली कधी

तीच आहे हॊस आम्हा व्हावया शायर कुणी
आरती प्रभुही आज आहे आज आहे संदीप कुणी

न तंत्र न मंत्र शिकलो इतकेच बस लिखते रहो
समजले इतुकेच अंती लिखते रहो लिखते रहो

माणसापरीस साधाच कवीस जो ह्या समजला
मानु आम्ही त्यालाच आहे मर्म काही समजला

जन्मला जो जो येथे तो कवी आहे जन्मला
काव्यसर ह्या देशी अनादीकाळापासुन रंगला


--
मंदार

ती रात्र सोडवुन जा

रंगली आहे तुझ्यात
ती रात्र सोडवुन जा
केसात माळलेला तो
तु मोगरा उतरवून जा

आर्तता तनात छेडलेली
तु सार्थकी लाऊन जा
गंध तुझीया श्वासातले
तु ओठात भारून जा

स्पंदणार्‍या काळजाचे
तु तराणे छेडुन जा
ती प्रेमात रंगणारी
तु गझल गाऊन जा

ओढ डोळा दाटलेली
झणी बरसत होती
तुझ्या माझ्या प्रीतीत
तु आज भिजून जा


--
मंदार हिंगणे
०२-११-२००९.

रातराणी ..

.
सरत्या मैफ़िलीत कशी नादली गाणी
न कळे पुन्हा कशी गायली रातराणी

घेउन क्षण आठवांचे पाउल निघता निघेना
पकडुन हात घट्ट आज थांबली रातराणी

जडावल्या मनीचे गंध मिळाले श्वासांना
अखेर ओठांशी माझ्या स्पर्शीली रातराणी

सांगणार कसे, तीस शब्दांचीही साथ नाही
आवेगातच मजला बिलगली रातराणी

समजाऊ कसे तीला काही केल्या कळेना
अबोल संभ्रमात मलुल पडली रातराणी

शेवटची भेट ही मना हेलावुन गेली
बहरलेल्या ह्रुतुतही ही सुकली रातराणी

दु:ख नसे कुणा की, स्वप्न मिलनाचे अधुरे
पाहुनी अश्रु माझे ती पहा रडली रातराणी



---
मंदार हिंगणे
(साद मनाची)
२८-१०-२००९

आणि जिवन जिंकत गेले

कोण बघतय कुणाची वाट ?
झाडाने बघीतली
फ़ळा फ़ुलांची वाट ?
फ़ळांनी चिमुकल्या रोपांची वाट?
अन जमीनीच्या गर्भातुन त्यांनी अंकुरण्याची वाट?
अश्या प्रत्येक वेळीस "जिवन" जिंकत आले ..

प्रेमास मिळाली सावली
प्रीयेच्या मस्ती भारल्या तारूण्यात.
तीच्या काळ्याभोर डोळ्यात ..
एका तान्हुल्याचे निष्पाप स्मित मिळाले..
आणि पुन्हा एकवार "जिवन" जिंकले..

उगवत्या सुर्याच्या पुन्हा मावळण्यात
चंद्राच्या चंचल विहरण्यात
रात्रीच्या अलवार तरंगात
आणि प्रात:काळच्या भुपालीच्या स्पंदनात
प्रत्येक वेळी "जिवन" जिंकले .

साधकाच्या विशुध्द साधनेत
तापसाच्या कठीण तपश्चरेत
मॊनीच्या अबोल अवस्थेत
नि:सीम भक्तिच्या शब्दातीत भक्तिमधे
प्रत्येक वेळी "जिवन" जिंकत गेले


---
मंदार

तुझ्यात मी

.

तीच मी
तुझ्यातली |
गंध भारल्या
श्वासतली |

मिट डोळे
पावशी मला |
उघडता डोळे
स्वप्नातली |

येथे तेथे
शोधीसी उगा |
मी तुझ्या सवे
सावलीतली |

तुझीच मी
संपली जरी |
उरेन मी
भासातली |

बघ वेड्या
ह्रुदयांतरी |
मी प्रवाह
रक्तातली |



--
मंदार(साद मनाची)
०९-१०-२००९.

महाभारत..कथा नाही सत्य आजचे

महाभारत
ही कथा नाही
एक आपलेच आणि
त्या हरएक युगाचे सत्य आहे
जेथे
बुरसटलेल्या सांस्क्रुतीक बेड्या,
डळमळलेला आशावाद,
मुल्यहिनता आणि भ्रष्ट समाजवाद
जिवनाचे मापदंड ठरतात..

जेव्हा ,
न्यायासाठी बंद असता ध्रितराष्र्टा चे डोळे
आणि जैसे ठेवली अनंते तैसेची राहाणे हा धर्म
जेथे,
आचार्य द्रोणाचार्‍यांचे कर्तव्य
पोट भरविण्यासाठी कोणापुढेही नतमस्तक होते

येथे तयार होते पार्श्वभुमी "महाभारताची"

जेथे
दुर्योधन आणि दु:शासन
हे खरे खलनायक नाहीच मुळी
ते तर फ़क्त बाहुले शकुनीच्या हातातले

जेथे,
कर्ण आणि एकलव्य
बळी ठरतात
एकाच व्यव्यस्थेचे
की जी गांधारी प्रमाणे
आपल्याच डोळ्यांनवर पट्टी बांधते

स्वताच्या अपमानाने डिचवलेली द्रौपदी
विसरून जाते की,
दुसर्‍यांच्या जाती आणि विकलांगतेवर
व्यंग करतांना
स्वत:च्याच संस्काराच्या उणीवा दिसतात..

आजही द्रौपदीला डावावर लावणारे
षंढ आजही समाजात वावरतात.

तर,
महाभारत
जी फ़क्त कथा नाही
सत्य आहे
कदाचीत
आपल्या ह्याच काळातले..नाही का?


--
मंदार